प्रिजीतच्या अनेक वर्षांच्या प्रेमाचा एका खोट्या गुन्ह्यामुळे होणार अस्त….?

0

मला काहीही त्रास नाही अस पोलिसांसमोर म्हणणारी तरुणी बलात्काराचा गुन्हा कसा दाखल करते?

 

मळनेर : येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेताना शहरातीलच डान्स शिकवणारा जितेंद्र संदानशिव याच्या कडे सदर मुलगी डान्स शिकण्यासाठी जाते…. त्यांच्यात प्रेम होते…. प्रेमात नंतर लग्न होते… संसार सुखाचा चालतो…. मात्र अचानक काही वर्षांनी मुलीचे आई, वडील आणि इतर नातलग येतात, पोलीस ठाण्यात अर्ज देतात की, आमच्या मुलीला डांबून ठेवलंय, तिला त्रास होतोय. मात्र पोलीस ठाण्यात जाऊन सदर मुलगी हे सगळं खोट आहे असे म्हणून अर्ज देणाऱ्यांच्या तोंडावर चापट मारते. आणि तीच मुलगी अवघ्या काही दिवसात घरात कुणाला न सांगता आपल्या आई-वडिलांकडे जाते व तेथूनही काही महिन्यांनंतर आपल्या नवऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करते. हो हा विषय आहे आपण आज सकाळ पासून वाचत असलेल्या बातम्या व त्यातील पात्रांच्या बाबत….

अमळनेर पोलीस ठाण्यात 0 नंबरने सुरत – गुजरात येथून काल एक गुन्हा आला. त्यात अमळनेर येथील जितेंद्र संदानशिव यावर त्याच्या बायकोने माझ्यावर बलात्कार झाल्याबाबत गुन्हा दाखल केला.

प्रिजीत यांची कथा सुरू होते सुमारे सहा वर्षांपूर्वी पासून, प्रित 12वी वर्गात होती. आणि जितू कडे डान्स शिकण्यासाठी आली. त्यातच दोघांध्ये प्रेम झाले. प्रेम झाले…. यात एकट्या जीतूचा विषय नाहीच. मुलगी सुद्धा तेवढीच जबाबदार असावी. प्रेमात काही वर्ष झाली आणि प्रितच्या घरात लग्नाचे विषय सुरू असताना प्रीतने जितूला सांगितल्या प्रमाणे त्याने लग्न केले. व काही महिने ते बाहेरगावी राहिले. मात्र अंगाला हळद लागायला हवी असे हिंदू धर्म संस्कृती म्हणते. बौद्ध धर्मात अंगाला हळद लागत नाही… अंगाला हळद लागायला हवी म्हणून जितूच्या घरच्यांनी गावात लग्न लावण्याचे ठरवले. काही हिंदू तर काही बौद्ध पद्धतीने लग्न लागले. यात प्रित… देखील मोठ्या उत्साहात सहभागी होती. तिने उत्तम प्रकारे डान्स देखील केला होता. एवढ्या उत्साहात लग्नात हजर राहून मग आपल्या सासू साऱ्यांनी बळजबरीने बौद्ध धर्म स्वीकारून लग्न लावले हे एवढ्या वर्षांनी कसे आठवले ? हा विषय एखाद्या धर्माला बदनाम करण्याचा असू शकतो. व दोन धर्मात तेढ देखील निर्माण होऊ शकतो. याची जाणीव संबंधितांना असायला हवी.

तर लग्नानंतर म्हणजे 2022 पासून अमळनेर येथील प्रतिष्ठित महिलांमध्ये प्रीत…. राहत होती. 2022 पासून ते 2025 पर्यंत म्हणजे 3 वर्षात आज सदर मुलीला कळते की, आपल्यावर बलात्कार झाला आहे. तेही आपल्या आई वडिलांकडे जाऊन!

गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रीतचे आई वडील हे अमळनेर पोलीस ठाण्यात आले होते. त्यांनी आमच्या मुलीला डांबून ठेवले आहे व तिला मारझोड होत असल्याचा अर्ज पोलिसांना दिला होता. त्यावेळी पोलिसांनी दोघांना समोर बोलावून स्पष्ट केले होते. की असे काहीही झाले नाही. सदर तरुणी त्यावेळी पोलीस ठाण्यात येण्यास नाही म्हणत असे, तिला विचारले असता तिने सांगितले होते की, मला माझे नातलग ब्लॅकमेल करून घेऊन जातील. मात्र जितूने समजवल्यावर ती तरुणी पोलीस ठाण्यात आली. व पोलिसांच्या समोर स्पष्ट सांगितले की, मला माझे सासू, सासरे, नवरा, व इतर लोकांकडून काहीही त्रास नाही. पोलीस तिचे आई-वडील यांच्यासमोर तिने हे सांगितले होते. मग काही दिवसांनीच एवढा मोठा पाऊल का घेतला असावा हा संशोधनाचा विषय म्हणावा लागेल.
प्रीतच्या मनातील भीती खरी ठरली का ?
तिच्या आई वडिलांनी तिला काही मोठी धमकी देऊन ब्लॅकमेल केलंय का ?
असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

म्हणून सुज्ञ अमळनेरकरांनी ह्या बनावट गुन्ह्याकडे जास्त गांभीर्याने न पाहता व उलट जीतूच्या समर्थनार्थ उभे राहावे.

हीच अपेक्षा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!